पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन   

श्रीनगर : पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडून मदत मागण्यासाठी एक व्यापक योजना तयार केली जाईल, असे जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी सांगितले.सिन्हा म्हणाले, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान झालेल्या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील अनेक घरे आणि व्यावसायिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. 
 
मी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांसह त्या ठिकाणांना भेट दिली. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने नुकसानीचे मूल्यांकन केले आहे आणि नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्यात आली आहे. ज्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही, त्यांना मदत पुरवण्यात येईल. तथापि, नागरिकांना देण्यात आलेली मदत पुरेशी नाही. केंद्र सरकारकडे अधिक मदत मागितली जाईल. विभागीय आयुक्त या नुकसानीसाठी एक व्यापक योजना तयार करतील आणि त्या आधारे आम्ही केंद्र सरकारला विनंती करून बाधित लोकांचे पुनर्वसन करू, असेही ते म्हणाले.

Related Articles